तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते. पाण्याच्या वापराबाबत, तसंच सद्य दुष्काळी परिस्थितीबाबत साक्षर करण्यासाठी माहितीवर हे स्टॉल्स होते. तसंच सरकारच्या विविध योजनांचीही माहिती यात देण्यात आली. 'पाण्याचा एक एक थेंब वाचवूया आणि जलसाक्षरता, जलपुनर्भरण करूया,' हे व्रत घेऊन सगळ्यांनीच यात सहभाग घेतला. 'भारत4इंडिया' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर होता. याचाच आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी...
Comments
- No comments found