८६वं अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणमध्ये साजरं झालं. अनेक विद्वानांनी हे साहित्य संमेलन की जत्रा, असा सवाल करणारे लेख लिहून नाकं मुरडली. या संमेलनाला न भूतो न भविष्यति अशी रसिकांची गर्दी झाली होती. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. करमणुकीचे कार्यक्रम भरपूर होते. नागरिकांनी तुफान मजा केली. पण या महान विचारवंतांना परिसंवाद आणि कविता दर्जेदार नव्हत्या म्हणून बद्धकोष्ठ झालं. दर्जा म्हणजे त्यांची काय कल्पना असावी?
ताड की फाड
This is some blog description about this site
ताड की फाड
भारतीय समाज असा काही एक समाज आहे हे आपण पूर्णपणं विसरून गेलो आहोत. कारण गेल्या काही वर्षांत जातीच्या राजकारणानं आणि धर्मांधतेनं समाजाला इतकं ग्रासलं आहे की, आपण भारतीयत्व विसरूनच गेलो आहोत. राजकीय लाभासाठी धर्म आणि जातीचा मिळेल त्या पद्धतीनं, मिळेल तसा लाभ उठवण्यासाठी अत्यंत लालचावलेले नेते याला जबाबदार आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता ओबीसींच्या धर्मांतराची चळवळ सुरू झाली आहे. हे राजकारण समाजात दुही निर्माण करणारं आहे. हिंदू धर्मात तर कमालीची बजबजपुरी माजली आहे.
चिपळूणच्या साहित्य संमेलनाचा जो पंचनामा चालला आहे तो अत्यंत योग्यच आहे. या संमेलनामुळं साहित्य क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या राजकीय दलालांचं खरं स्वरूपच उघडं पडलं आहे. चवलीचा खर्च साहित्यिकांवर आणि अधेलीचा खर्च मांडवावर अशा पद्धतीचा नियोजनशून्य खर्च करून राजकीय नेत्यांशी हातमिळवणी केलेल्या दलालांनी कोट्यवधी रुपयांची चांदी केली. हा सारा पैसा सार्वजनिक आहे, जनतेचा आहे. तो अशा पद्धतीनं उधळला जाणं हे साहित्यातील नैतिकतेच्या कल्पनेला मुळीच शोभणारं नाही. अशी प्रवृत्ती साहित्य क्षेत्रात सुरू झाली तर ती घातक ठरेल. तेव्हा याविरुद्ध ठामपणं आवाज उठवणं आवश्यक आहे.
चिपळूणला होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक कोटीच्या कोटी उड्डाणं प्रकारचा इव्हेंट झाला आहे. 'नाल आहे, तो वापरता यावा म्हणून घोडा आणला' या म्हणीप्रमाणं भव्य मांडव करोडो रुपये खर्चून घालण्याची अतिशय हौस होती म्हणून साहित्य संमेलन भरवलं जात आहे, असं म्हणायची वेळ आली आहे. कारण या तीन कोटींच्या तमाशासाठी जो मांडव घातला आहे त्याचा खर्चच सुमारे दोन कोटी असल्याची चर्चा सुरू आहे.

भालचंद्र दिवाडकर
गेली ३० वर्षं पत्रकारितेत. शेती, पर्यावरण, विज्ञान, राजकारण या विषयांचे अभ्यासक. 'दै. सागर'मध्ये वरिष्ठ सहसंपादक पदावर कार्यरत. 'एनरॉनची अंधारयात्रा' हे एनरॉन प्रकल्पाविषयी परखड विश्लेषण करणारं पुस्तक प्रसिद्ध. मुलांसाठी वैज्ञानिक विषयावरची; तसंच इतर एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध.