टाटा समूहाचे अलीकडेच प्रमुख बनलेले सायरस मिस्त्री यांनी समूहातील एका कंपनीच्या भागधारकांच्या बैठकीत अशी इच्छा प्रकट केली की, येणाऱ्या काळात कंपनीत महिलांचा वावर वरिष्ठ आणि इतरही पदांवर वाढलेला बघणं आपल्याला आवडेल. महिलांमुळं कार्यालयातील वातावरण, संस्कृती यात बदल होतो आणि पुरुषांना पूरक ठरेल असं योगदान त्या देत असतात, अशी भावनाही मिस्त्री यांनी बोलून दाखवली. स्त्रियांच्या वावरामुळं कार्यालयांना एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्वरूप प्राप्त होतं. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीही अनेकदा आगळ्यावेगळ्या असतात आणि निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यात असते यावर आपला विश्वास असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
इतिस्त्री
This is some blog description about this site
इतिस्त्री
स्त्रियांकडे पूर्वग्रह बाळगून बघू नये, त्यांचा सन्मान राखावा असं नेहमीच म्हटलं जातं. पण ते केवळ बोलण्यापुरतंच राहतं याचाही अनुभव आपण नेहमीच घेत असतो. महिला व मुलींवर ज्या पद्धतीने अत्याचार होत असतात त्यावरून याचं प्रत्यंतर वारंवार येत असतं. त्यातही ज्यांनी सर्वांनाच सुरक्षित ठेवण्याचं काम करणं अपेक्षित असतं त्या पोलिसांकडून तर स्त्रियांबाबत वारंवार आगळीक घडत असते. म्हणूनच पोलिसांमध्ये संवेदनशीलता जागी राहण्याची आवश्यकता आहे, हे वाक्य अलिकडे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते. आता पोलिसांमधल्या संवेदनशीलतेचा संबंध खरं तर खास करून महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि त्यांचे एकूणच हक्क या बाबींशी जोडलेला आहे. पण प्रत्यक्षात या संदर्भात पोलीस बहुतांशी संवेदनाहीनतेने वागतात असंच दिसून येतं.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल अलीकडेच जाहीर झाले आहेत. त्यात खास करून महिलांनी जे यश मिळवलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. यंदा पहिला नंबर पटकावणारी हरिता कुमार ही तर याआधी तीनदा या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही, अपेक्षित स्तरावरील यश न मिळाल्यानं ती पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिली आणि यावेळी ती चक्क पहिली आली. हवी ती उंची गाठण्यासाठी तिनं केलेली धडपड आणि दाखवलेली जिद्द खूप महत्त्वाची आहे. यशा-यशातही गुणवत्तेचा फरक असतो आणि मनानं उभारी घेतली, तर आपल्याला हवं तिथे भरारी घेता येते, हे हरितानं सिद्ध केलंय...
एकच आरोप परत परत एखाद्या व्यक्तीवर ठेवला गेला, तर काय म्हणावं? हा अतिरेक म्हणावा की त्या व्यक्तीचं निर्ढावलेपण? फणीश मूर्ती या आयटी क्षेत्रातील बड्या अधिकारी माणसाबाबत हे चाललंय काय, असा प्रश्न मनाला पडतो. अलीकडे तिसऱ्यांदा फणीश मूर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. यावेळी त्याला आयगेट ग्लोबल या कंपनीतून बाहेर जाणं भाग पाडलं आहे. याआधी याच तऱ्हेच्या आरोपावरून त्याला इन्फोसिसमधून पायउतार व्हावं लागलं होतं. लक्षावधी डॉलर्सची भरपाई मागणारे खटले त्याच्यावर झाले आहेत आणि आताही होतील. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तीनदा आरोप होणं हे या माणसाचं निर्ढावलेपणच सिद्ध करणारं आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारतर्फे वेगवेगळे उपाय योजले जातात. त्यात इतर अनेक गोष्टींबरोबर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा विचारही केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देशात महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या आहेत. ही नियोजित बँक महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक असेल, असंही चिदंबरम यांनी स्पष्ट केलं होतं. हाही मुद्दा वादाचा ठरू शकतो. महिलांची दखल घेण्यासाठी वेगळी संस्था उभी करावी लागते, याला कारण आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्था महिलांची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांचा आणि मागण्यांचा पुरेसा विचार करत नाहीत याची कबुलीच एक प्रकारे यातून अधोरेखित होते...

नंदिनी आत्मसिद्ध
मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.