संपणाऱ्या वर्षात, म्हणजे 2012-13 मध्ये वित्तीय तूट 5.3टक्के (जीडीपीच्या तुलनेत) असेल, असं भाकीत होतं. प्रत्यक्षात ती 5.2टक्के आहे. म्हणजे सहा महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात खर्चाला त्यांनी किंचित लगाम घातला आहे. 2013-14 मध्ये तूट 4.8टक्के असेल. बजेट मांडल्यानंतर स्टँडर्ड अॅण्ड पूअरनं भारताचा पतदर्जा कायम ठेवला असून, मध्यम अवधीत तूट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. साम्राज्यवादी देशातल्या पतमापन संस्थांना एवढी किंमत कशाला द्यायची, असं जळजळीत मत लालभाई व्यक्त करणारच. पण जगाच्या बाजारात ज्याच्या मताला किंमत आहे, त्याचंच मत विचारात घ्यावं लागतं! पत खालावली, तर भारताला जादा व्याजदरानं कर्जं घ्यायला लागली असती, हे या मंडळींना कोण समजावून सांगणार...
EasyBlog
This is some blog description about this site
Blog posts tagged in खर्चशाहीचा वारू काबूत