गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पणजीत काँग्रेसमुक्त भारत निर्माणाची घोषणा केली, तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जमलेले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरलं. निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाल्यावर या मंडळींच्या चेहऱ्यावर तुकतुकी आली होती. काही बडे नेते नाराज झाले आणि नवी दिल्लीस रवाना झाले. मात्र कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक संपल्यावर भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी क्षेपणास्त्र सोडताच धरणीकंप झाला. त्यामुळं मोदी, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली प्रभृतींचे खुललेले चेहरे एकदम करपून गेले... ‘तेरी दुनिया से होके मजबूर चला, मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूऽऽऽर चला’ असं म्हणणाऱ्या अडवाणींच्या राजीनामानाट्याचे आणि माघारीचे, तसंच विशेषतः मोदींच्या नियुक्तीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहेत.
EasyBlog
This is some blog description about this site
Blog posts tagged in महाराष्ट्राचे ‘मोदी’