पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. यूपीए सरकारची लोकप्रियता निश्चितपणं घसरणीला लागली आहे. अशा वेळी प्रथम नवी दिल्लीत आणि नंतर महाराष्ट्रात सत्तापालट घडवायचा, तर प्रथम स्वतःचं घर दुरुस्त करावं लागेल, हे भारतीय जनता पक्षाला उमगलेलं दिसतं. त्यामुळंच राजधानीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांचा ‘गणपती बाप्पा मोरया’ करण्यात आला आणि आता प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाही नारळ देऊन तिथं तरणेबांड नेते देवेंद्र फडणवीस यांना बसवण्यात आलं आहे.
EasyBlog
This is some blog description about this site
विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली ती विरोधकांमधल्या फुटीवरून... सभागृहाबाहेरचा इश्यू, पण वातावरण मात्र तापलं ते विधिमंडळ परिसरातलं... राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले आणि मग त्याला उत्तर मिळणार हे अपेक्षितच होतं. त्याप्रमाणं खडसेंनी त्याला उत्तर दिलंच... अगदी थेट सेटलमेंट केली असती तर कोहिनूर मिल खरेदी केली असती, असा थेट टोलाही लगावला. या आरोप-प्रत्यारोपांनंतर राजकीय समीकरणं बदलली. मनसेचा आमदारांचा गट विधानसभेत वेगळा बसणार हे स्पष्ट झालं. अखेर भाजप-मनसेमध्ये कडवटपणा निर्माण झाला. आता तो कुठल्या थराला जाणार याची चुणूक दिसायला लागलीच आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजपचा पाठिंबा मनसेला मिळालाय. त्याचा फेरविचार सुरू झाल्याची चर्चाही विधिमंडळ परिसरात सुरू झाली.