गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पणजीत काँग्रेसमुक्त भारत निर्माणाची घोषणा केली, तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जमलेले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरलं. निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाल्यावर या मंडळींच्या चेहऱ्यावर तुकतुकी आली होती. काही बडे नेते नाराज झाले आणि नवी दिल्लीस रवाना झाले. मात्र कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक संपल्यावर भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी क्षेपणास्त्र सोडताच धरणीकंप झाला. त्यामुळं मोदी, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली प्रभृतींचे खुललेले चेहरे एकदम करपून गेले... ‘तेरी दुनिया से होके मजबूर चला, मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूऽऽऽर चला’ असं म्हणणाऱ्या अडवाणींच्या राजीनामानाट्याचे आणि माघारीचे, तसंच विशेषतः मोदींच्या नियुक्तीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहेत.
EasyBlog
This is some blog description about this site
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रतिष्ठेचा केलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प २००५ मध्ये मंजूर झाला, त्यास शिवसेनेनं राजकीय विरोध सुरू केला. आज प्रकल्पस्थानी भिंत बांधण्याचं काम चालू असतानाच जमीन खरेदीही केली जात आहे. परंतु प्रकल्पासाठी निश्चित न झालेल्या जमिनीवरही आक्रमण केलं जात असल्याचा आरोप प्रकल्पानजीकच्या धनिवरे गावच्या नागरिकांनी नुकताच केला आहे. तिथं आंब्याची ५०० झाडं असून, त्यावर गावकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. अर्थात, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.ला हे मान्य नसेलच. स्थानिकांना शिवसेनेची फूस आहे, असा आरोप कोकणचे कार्यसम्राट करतीलही... महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसानं जोर धरला आहे. परंतु याचा अर्थ दुष्काळ संपला, असं नव्हे. दुष्काळासाठी कोणी काय केलं याचे दावे-प्रतिदावे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले. मदतनिधीवर हात मारण्यात आल्याचे आरोप झाले. परंतु दुष्काळाचं कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलं आहे. जलसिंचनाचे ७० हजार कोटी रुपये कुठे गडप झाले हे कळलं नाही. आता हे ६५ हजार कोटी रुपये मिळाल्यास, एखादा प्रादेशिक पक्ष लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवण्याचा खर्चही करू शकेल!
गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना ठिकठिकाणी हॉटेलांत श्रीमंत लोक आयपीएल बघत भोजनानंद घेताना दिसले. दुसरीकडे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला 24X7 पाण्याचाच विचार करत तृषार्त अवस्थेत जगायला लागत आहे... तर तिकडे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात यंदा शंभर दिवस तरी ऊस गळीताचा हंगाम चालेल की नाही, याची शंका होती. शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केल्यावर, मग कर्नाटकानं ऊस पळवू नये म्हणून साखर कारखानदारांनी धडपड केली. नेटानं गाळप सुरू ठेवत कारखान्यांनी अपेक्षित उद्दिष्ट गाठलं. गंमत म्हणजे साखरेच्या उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांनी नव्हे, तर खासगी कारखान्यांनी बाजी मारली.
''डॉक्टर लोक भयंकर पिळवणूक करू लागलेत,'' त्यांनी काळजीच्या सुरात तक्रार व्यक्त केली. मी होकारार्थी मान डोलावताच त्यांचा उत्साह वाढला. म्हणाले, ''हे तुमचं जागतिकीकरण आल्यापासून माणसाला धड जगताही येत नाही अन् मरताही येत नाही.''
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल अलीकडेच जाहीर झाले आहेत. त्यात खास करून महिलांनी जे यश मिळवलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. यंदा पहिला नंबर पटकावणारी हरिता कुमार ही तर याआधी तीनदा या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही, अपेक्षित स्तरावरील यश न मिळाल्यानं ती पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिली आणि यावेळी ती चक्क पहिली आली. हवी ती उंची गाठण्यासाठी तिनं केलेली धडपड आणि दाखवलेली जिद्द खूप महत्त्वाची आहे. यशा-यशातही गुणवत्तेचा फरक असतो आणि मनानं उभारी घेतली, तर आपल्याला हवं तिथे भरारी घेता येते, हे हरितानं सिद्ध केलंय...