मी सोलापूर जिल्ह्यातला. आमच्या जिल्ह्यात दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला. 1972 साली दुष्काळ पडला, त्या दुष्काळात भयानक उपासमार झाली. लोकांनी बरबट्याच्या (जंगली झुडूप) भाकरी खालल्याचे जुनी माणसं सांगतात.
EasyBlog
This is some blog description about this site
तबरेज सायेकर हा जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निर्मितीतला पहिला बळी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. तो साखरीनाटे गावचा, मुस्लिम दालदी समाजातला. तो गेल्या नंतर त्याचे आई-वडील अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. त्यांचा कुणीही वाली उरलेला नाही कारण त्यांचा तो एकमेव आधार होता.
विकासप्रवाह आदिवासींपर्यंत (भाग-1) Featured
18 मार्च 1985ला अहेरी उपविभागीय अधिकारी म्हणून मी चार्ज घेतला. ही माझी पहिली पोस्टिंग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्यावर पहिल्यांदा मार्च 83मध्ये वर्धा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी रुजू झालो. 1984मध्ये प्रशासकीय कारणास्तव गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्याचा आदेश मिळाला. ओएनजीसीमधील नोकरीचा राजीनामा दिला होता. मुंबई ते वर्धा आणि आता गडचिरोलीला जावं लागणार होतं. माझे वडील शिकले नव्हते, तरीही ते म्हणायचे,`` ही काय ओएनजीसीची नोकरी करतोस, नायब साहेब, कलेक्टर बन व गरिबांसाठी, वंचितांसाठी कार्य कर.`` या विचारांच्या प्रभावामुळं मी या सेवेकडं आकर्षित झालो. 11 जानेवारी 1984ला गडचिरोलीला जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालो.
सेनाप्रमुखांच्या निधनाच्या दिवशी मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदबाबत शाहीन धाडा या तरुणीने फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तिच्या काकांच्या पालघर येथील रुग्णांलयावर हल्ला झाला. या हल्ल्याचं जोरदार समर्थन शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांनी केलं आहे. शिवसैनिकांची ही उत्स्फूर्त भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राऊळांना उध्दवजींनी उत्स्फूर्तपणे पदमुक्त करावं. 'दहशतवादी' शिवसेना मला नको आहे, हा संदेश त्यांनी मावळ्यांना जरूर द्यावा. मातोश्रीला खूश करण्यासाठीच असले 'पराक्रम' केले जातात.