गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना ठिकठिकाणी हॉटेलांत श्रीमंत लोक आयपीएल बघत भोजनानंद घेताना दिसले. दुसरीकडे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला 24X7 पाण्याचाच विचार करत तृषार्त अवस्थेत जगायला लागत आहे... तर तिकडे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात यंदा शंभर दिवस तरी ऊस गळीताचा हंगाम चालेल की नाही, याची शंका होती. शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केल्यावर, मग कर्नाटकानं ऊस पळवू नये म्हणून साखर कारखानदारांनी धडपड केली. नेटानं गाळप सुरू ठेवत कारखान्यांनी अपेक्षित उद्दिष्ट गाठलं. गंमत म्हणजे साखरेच्या उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांनी नव्हे, तर खासगी कारखान्यांनी बाजी मारली.
EasyBlog
This is some blog description about this site
''डॉक्टर लोक भयंकर पिळवणूक करू लागलेत,'' त्यांनी काळजीच्या सुरात तक्रार व्यक्त केली. मी होकारार्थी मान डोलावताच त्यांचा उत्साह वाढला. म्हणाले, ''हे तुमचं जागतिकीकरण आल्यापासून माणसाला धड जगताही येत नाही अन् मरताही येत नाही.''
'ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिची गय केली जाणार नाही.'
'कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्याची बूज राखली जाईल.'
'सरकार कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यास समर्थ आहे.'
ही वक्तव्यं कोणाची? अर्थातच महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील उपाख्य आबांची. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील गुन्ह्यांची संख्या वाढल्याची कबुली खुद्द पोलीस आयुक्तांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात वांद्रे रेल्वे स्थानकावर एका तरुणीवर अॅसिड हल्ला झाला. स्त्रियांच्या छेडछाडीचे आणि बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. आमदारच पोलिसांना तुडवतात आणि लालबागच्या पुलावर वाहतूक पोलिसाला काही मोटरसायकलस्वार पिटून काढतात. अनधिकृत बांधकामाचं समर्थन करताना डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण एका पत्रकाराला जाहीरपणे धमक्या देतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल अलीकडेच जाहीर झाले आहेत. त्यात खास करून महिलांनी जे यश मिळवलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. यंदा पहिला नंबर पटकावणारी हरिता कुमार ही तर याआधी तीनदा या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही, अपेक्षित स्तरावरील यश न मिळाल्यानं ती पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिली आणि यावेळी ती चक्क पहिली आली. हवी ती उंची गाठण्यासाठी तिनं केलेली धडपड आणि दाखवलेली जिद्द खूप महत्त्वाची आहे. यशा-यशातही गुणवत्तेचा फरक असतो आणि मनानं उभारी घेतली, तर आपल्याला हवं तिथे भरारी घेता येते, हे हरितानं सिद्ध केलंय...
दुष्काळग्रस्तांसाठी २५ टक्के निधी राखून ठेवणारा अर्थसंकल्प मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी थोड्याच दिवसांत दुष्काळग्रस्तांचीच कुचेष्टा करणारं वक्तव्य करून सगळ्यावर पाणी ओतलं... सध्या देशातच नव्हे, तर महाराष्ट्रातही सत्ताधारी आघाडीविरुद्धचा असंतोष कमालीचा वाढतो आहे. मी राज्यात आणि राज्याबाहेरही ठिकठिकाणी फिरत असतो. तेव्हा लोकांशी बोलताना जाणवतं की, त्यांना आता बदल हवा आहे. ते सरकारच्या कारभाराला आणि बेबंद वर्तनास विटले आहेत. पण ठोस पर्याय मिळत नसल्यानं त्यांची कुचंबणा होत आहे. ही कुचंबणा फक्त राजकीय नाही. या राज्याची आर्थिक कुचंबणाही होत आहे...