अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘रेस’ या चित्रपटात विदेशातील अश्वशर्यतींची दृश्यं आहेत. परंतु अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या कित्येक चित्रपटांत मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरचे प्रसंग आहेत. नायक वा खलनायकाचा आर्थिक स्तर आणि त्याची जीवनशैली दर्शवण्याचा सोपा उपाय म्हणजे कॅमेरा महालक्ष्मीच्या दिशेनं नेणं; एकेकाळी गीतकार राजेंद्र कृष्णला इथंच लाखो रुपयांचा जॅकपॉट लागला होता. रणजीत स्टुडिओचा मालक चंदूलाल शाह रेस नि जुगारातच कंगाल झाला. त्याउलट पुण्याच्या हसन अलीच्या मालकीचे घोडे आहेत आणि त्याच वेळी तो ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट’चे काय काय उद्योग करतो ते सर्वश्रुत आहे. मराठीत विलासदत्त राऊत यांची रेसकोर्सवर ‘चौखूर’ ही कादंबरी आहे. ती पुण्याच्या काँटिनेंटल प्रकाशनच्या दिवंगत अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केली; त्यांचे आजोबा अश्वपारखी होते. आता मात्र महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा टर्फ क्लबला वाढवून देऊन ही जागा सार्वजनिक मनोरंजन मैदानासाठी (थीम पार्क) मोकळी करण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं महापालिका आयुक्तांकडं दिला आहे. तो प्रत्यक्षात आल्यास रेसकोर्स इतिहासजमा होईल.
EasyBlog
This is some blog description about this site
केंद्रातील यूपीए सरकार अल्पमतात आल्यानंतर, मुदतपूर्व निवडणुका कधीही होऊ शकतात, असं भाकीत वर्तवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारच्या कारभाराबद्दलची आपली नाराजी लपवली नाही. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी स्टार वाहिनी आणि नेल्सननं केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील लोकशाही आघाडी सरकारचा आगामी विधानसभा निवडणुकांत पार खुर्दा होईल, असा अंदाज व्यक्त झाला. भ्रष्टाचारामुळं सरकारची प्रतिमा डागाळल्याचं मत सामान्य प्रशासन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फौजिया खान यांनीच व्यक्त केलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वेक्षणाचा विचार झाला आणि अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. सरकारची प्रतिमा कशी सुधारायची, यावर बराच खल झाला. आता लोकशाही आघाडीच्या भवितव्यावर खुद्द शरद पवार कोणतं प्रकट चिंतन करतात ते बघायचं!
पूर्वापार प्रचलित असलेल्या जाचक व जुलमी अशा वर्णव्यवस्थेचं अनौरस अपत्य असलेली जातिव्यवस्थेची कीड हाच या समृद्ध अशा महान देशावर लागलेला मोठा कलंक आहे. जाती व्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी अपार कष्ट सोसले. भारतातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या महापुरुषांनी अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, सामाजिक दुर्गुण, समाजव्यवस्थेला पांगळ्या करणार्या किडीचं अस्तित्व संपवण्यासाठी प्रचंड यशस्वी असे प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान निर्मितीची वेळ आली तेव्हा विधवा विवाह, बालविवाह बंदी, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता, जातीयवाद आणि सर्व प्रकारच्या तत्सम विषमवृत्तीला आळा बसावा या उदात्त हेतूनं या वृत्तीविरोधातल्या सर्व कायद्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये अंतर्भूत केलं. शतकानुशतकं जातीयतेच्या गुलामगिरीत खितपत पडल्यानं; तसंच सामाजिक आणि आर्थिक अवनतीमुळं शुद्रातिशुद्रांची जी भयावह स्थिती झाली होती त्यावर एकच उपाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दृष्टिपथास पडत होता आणि तो म्हणजे समान प्रतिनिधित्व.
आर्यन लेडी, मॅगी ऊर्फ मार्गारेट थॅचर यांचं ८७ व्या वर्षी निधन झालं. विन्स्टन चर्चिलनंतर इंग्लंडच्या समाजजीवनावर छाप पाडणारं त्यांचं दुसरं व्यक्तिमत्त्व होतं. म्हणतात की, इंग्लंड दोन भागात विभागता येतो, थॅचरपूर्वीचा आणि थॅचरनंतरचा इंग्लंड. मार्गारेट थॅचर यांचं व्यक्तिमत्त्व वादळी होतं. त्यांच्या निधनानंतर इंग्लंडच्या सर्व आघाडीच्या दैनिकांनी दिलेल्या हेडलाईन्सवर एक नजर टाकल्यास आपल्याला सहज कळेल.
मराठवाड्याचं मागासलेपण आजही कायम आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी आमचा मराठवाडा मागासलेलाच. आज मराठवाड्यामध्ये काय नाही; असं असताना कुठेतरी एकमेकांविरुद्ध विनाकारण द्वेष वाढत चालला आहे आणि त्यामुळं मराठवाड्याला त्याचं नुकसानही सहन करावं लागतं. नांदेड-लातूर वाद हाही गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. कुठल्या राजकीय पक्षानं लावलेला हा वाद नाही किंवा कुठल्या स्वार्थासाठी चिघळला गेलेला हा एखादा प्रश्न नाही, तर गैरसमजातून निर्माण झालेला या दोन्ही जिल्ह्यांचा वाद विकोपाला गेला आहे, ज्याचे परिणाम या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासह मराठवाड्याच्या विकासावरही होत आहेत, हे तेवढंच खरं आहे.