वॉलस्ट्रीट जर्नल (wallstreet journal) हे जगातील एक मोठं आणि विश्वासार्ह, तसंच प्रतिष्ठित वर्तमानपत्र मानलं जातं. २००८ मध्ये त्यांच्या काही स्टोरीजवर मी काम करत होतो. एरिक बेलमन या वार्ताहरासोबत मी दुभाष्याचं काम केलं. लोणार सरोवराजवळच्या गांधारी नावाच्या छोट्या गावात जायचं आहे, असं बेलमननं सांगितलं तेव्हा मी चकित झालो. कारण वॉलस्ट्रीट जर्नल हे प्रामुख्यानं उद्योग जगतावर आणि क्वचित राजकारणावर स्टोरी करत असे. इतक्या छोट्या खेड्यात त्यांच्यासाठी कोणती स्टोरी असणार? पण गांधारीतील १४ गावकरी मुंबईजवळ भिंत बांधताना ती कोसळून झालेल्या अपघातात मरण पावले. ही घटना २००६ मध्ये घडली होती. त्याला दोन वर्षं झाल्यानिमित वॉलस्ट्रीट ती स्टोरी करत होते. त्यात म्हटलं होतं की, भारताच्या प्रगतीचा वेग वाढत असताना भारतातील अपघातांचं प्रमाणही वाढत आहे. मरण पावलेली बरीच मंडळी एकाच कुटुंबातील होती. या अपघातात ५० जण जखमी झाले. त्यांना काहीही नुकसानभरपाई मिळाली नाही. १४ मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये मिळाले. ही सारी माहिती देऊन वॉलस्ट्रीटनं म्हटलं की, भारताच्या विकासवाढीचा वेग नऊ टक्के असताना देशभर रस्ते, इमारती, खाणी, धरण, बांधकाम यावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. बांधकाम करणाऱ्या मजुरांची सुरक्षा नसल्यामुळं अपघातांचा धोका वाढतो आहे. अशा मजुरांना कोणतंही प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनं दिली जात नाहीत. २००६मध्ये १० मोठे अपघात घडले. २००७ मध्ये १४, तर मार्च २००८पर्यंत ३१.
EasyBlog
This is some blog description about this site
रतन सिंग हा ३८ वर्षांचा शेतकरी. त्याला पाच मुलं आहेत. वर्षातील १० महिने शेती आणि दोन महिने सायकल रिक्षा चालवणं या पद्धतीनं तो काम करतो. जयपूरमध्ये फेस्टिव्हलच्या निमित्तानं गेलो असता तो भेटला. जयपूरमध्ये आजही सायकल रिक्षा चालतात. यात दोन माणसं बसू शकतात. १५ वर्षांपूर्वी दिल्लीत अशा सायकल रिक्षा पाहिल्या तेव्हा त्यात बसणं अवघड वाटलं होतं. पण आता इंधन टंचाई, महागाई यावर सायकल रिक्षा हा इकोफ्रेंडली उपाय वाटतो. रतन सिंग ग्रॅज्युएट आहे. आर्ट्सला सोशियॉलॉजी आणि साहित्य घेऊन त्यानं पदवी मिळवली. रिक्षा चालवून त्याला दिवसाला ४०० रुपये मिळतात. हे पैसे तो शेतीवर खर्च करतो. सरसो, बाजरी आणि ज्वारी ही तीन पिकं तो घेतो. त्यावर वर्षाला एक लाख रुपये मिळतात.
मराठी साहित्य संमेलन आता सुरू झालंय. हजारांची गर्दी कोट्यवधींचा खर्च, वादविवाद आणि जेवणावळी या साऱ्याची धामधूम तीन दिवस चालणार आहे. पण यात मराठी साहित्याचा दर्जा नेमका काय आहे, तो खालावतोय का, याची चर्चा फारशी होत नाही. जागतिक स्तरावर जपानी, चिनी, हंगेरीयन, इतकंच काय, तुर्कस्थानी लेखकांनीही मजल मारली. पण मराठी साहित्य कधी जागतिक स्तरावर काय, देश पातळीवरही चर्चेचा विषय ठरत नाही. याचं कारण त्याच्या दर्जात आहे का?