धबधबे खुणावतायेत तरुणाईलामुश्ताक खान कोकणात सध्या पावसाळा ऐन भरात आहे. पाऊस म्हटल्यावर कोकणाचं सौदर्य आणखीच खुलतं. त्यातच कोकणातल्या तरुणाईला सध्या फेसाळणारे धबधबे खुणावतायत. रत्नागिरी जवळच्या अशाच पानवल जवळच्या धबधब्याचा अनोखा नजराणा पर्यटकांची गर्दी खेचत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा धुबधब इतर धबधब्यांच्या तुलनेत सुरक्षितही आहे. रत्नागिरीमध्ये पावसाळा सुरु झाला की अनेक धबधबे जीवंत होता. काही धबधबे सगळ्यांना परिचीत आहेत तर काहींची ओळख अजूनही व्हायची आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातले अनेक धबधबे अंगावर अक्षरश: शहारे आणतात. त्यात मग चिपळूणचा सवत सडा, रत्नागिरीचा निवळी धबधबा, सिंधुदुर्गातला आंबोली इथला धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करतात. पण पानवळ इथला धबधबा स्थानिक पर्यटकांना जरी महित असला तरी तो बाहेरुन येणाऱ्या फारच कमीच पर्यटकांना माहित आहे. फेसाळत कड्यावरुन कोसळणाऱ्या पानवलच्या धबधब्यात चिंब भिजावं असंच प्रत्येकाला वाटत असतं.
Tags |
||
Comments
|